उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कामेगाव पाटी ते सांगवी रस्ता व तेरणे वरील कामेगाव सांगवीला जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याची 30 दिवसाच्या आत दुरूस्ती करा अन्यथा पाण्यात बसुन आंदोलन करु , असा इशारा निवेदनाद्वारे उपविभाग अभियंता क्र.१ यांना दिला आहे. आंदोलन दरम्यान जीवीत हानी झाल्यास त्यास प्रशासन व लोकप्रतिनिधीच जबबदार असतील असा ही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनावर मनसेचे पाडोळी (आ) जि.प . गटाचे विभाग प्रमुख दिपक लोंढे यांची स्वाक्षरी आहे.