उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावामध्ये “किराणा दुकानातून सामान घेउन येते.” असे कुटूंबीयांस सांगून घराबाहेर पडलेली एक 15 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) घरी लवकर न परतल्याने कुटूंबीयांनी परिसरात तीचा शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. यावरुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.