उस्मानाबाद / प्रतिनिधी-
वाघोली येथील निवृत्त शिक्षक श्री रामदास भगवान मते (वय ७७) राहणार वाघोली हे दिनांक 26 एप्रिल वार मंगळवार रोजी राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेले आहेत.
आज तब्बल नऊ दिवस उलटून गेले तरी त्यांचा शोध लागत नाही, त्यांचा वर्ण काळा-सावळा, पांढरे केस, विना अंगावर पांढरा सदरा व धोतर , व उजव्या पायाने अपंग असून अशी व्यक्ती कोणाला आढळून आल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा.
योग्य माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल.याबाबत उस्मानाबाद येथील ग्रामीण पोलीस ठाणे येथे व्यक्ती हरवल्या बाबत मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस प्रशासन याबाबत अधिक तपास करीत आहेत.