उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सध्या पंतप्रधान आवास योजना ग्रामीण व शहरी भागात चालू आहे. वाळू, सिमेंट, विट,मजूरी,यांचे संपूर्ण दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे एवढ्या कमी पैशात बांधकाम होणे शक्य नाही. त्यामुळे अनेकांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहेत. तरी ग्रामीण भागातील घरकुलासाठी तीन लाख रुपये व शहरी भागातील घरकुलासाठी चार लाख रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी तालुका उपाध्यक्ष सलीम औटी, तालुकाध्यक्ष महेश जाधव,ढोकी शहराध्यक्ष रजनीकांत ढवारे, रामचंद्र नेटके, राहुल खडके आदि उपस्थित होते


 
Top