उ
उमरगा / प्रतिनिधी-
अमाप धन हे दुखाचे कारण आहे . भौतिक सुखाने मनुष्य अधिक संकटात सापडला आहे . शुद्ध भावनेने देवाची भक्ती केली पाहीजे. संताच्या सान्निध्यात आल्यास दुखापासून मुक्ती मिळून चांगले जीवन जगता येवू शकते असा संदेश किर्तनातून अचलबेट देवस्थानचे हभप . हरी महाराज लवटे यांनी दिला . ते त्रिकोळी ता . उमरगा येथील अखंड हरीनाम सप्ताहामध्ये दि.२४ (गुरुवारी ) रोजी किर्तनाचे सहावे पुष्प गुंफताना बोलत होते .
संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील
हेंचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
न लगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ॥३॥
तुका ह्मणे गर्भवासी ।
सुखें घालावें आह्मांसी ॥४॥
हा अभंग किर्तन सेवेला घेतला होता. पुढे बोलताना लवटे गुरुजी म्हणाले की , लहान मुलाना दुरविचारापासून दुर रहावे . आई वडीलांनी मुलांवर चांगले संस्कार करावेत . चांगले संस्कार झालेली मुले समाजापासून कधीच दुर जात नाहीत . संस्कारक्षम पिढी घडविण्यची शक्ती फक्त अध्यात्मातच आहे . त्यामुळे अध्यात्मापासून कोणीही दुर जाऊ नये .
दि. २५ ऱोजी हभप दिनकर महाराज निकम यांच्या काल्याच्या किर्तन झाले. सप्ताहाची महाप्रसादाने सांगता झाली . या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन , गाथा भजन , नाम स्मरण , प्रवचन , संगीत भजन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . गेल्या ३८ वर्षापासून येथील सप्ताहाची परंपरा चालू आहे .यावेळी तानाजी पाटिल , व्यंकट मुगळे , प्रभाकर बिराजदार, विट्ठल गुरुजी, वसंत बिराजदार, हरी माडजे, मोहन पाटिल , अंकुश भोसले , विश्वनाथ कोडे , महादेव भोसले , शंकराप्पा स्वामी , मोहन वाडीकर , रमेश करनुरे, लक्ष्मण मुरमे , सुभाष पाटिल , खंडू गाडे , गुरु कारागीर , यांच्यासह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते .