उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, त्यांच्या तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेमार्फत सोडवत्या याव्या, त्यांना सुलभ मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी सकाळी ११.३० वाजता तहसीलदारांच्या दालनात महिला लोकशाही दिन घेण्यात येणार आहे. उस्मानाबाद तालुक्यातील पीडित महिलांनी विहित अर्जाद्वारे आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन अध्यक्ष तथा तहसीलदार, सदस्य सचिव तथा बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांनी केले आहे.


 
Top