उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हा परिषद स्वसंपादीत उत्पन्नातील ५ टक्के सेस अंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. त्यांनी विहीत नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी विभागाकडे दि. ३० नोव्हेंबरपर्यंत पाठवून द्यावेत,असे आवाहन जि.प.च्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

 
Top