उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५००००/- रुपयाची दोन दिवसात मदत देण्यात या मागणीसाठी सोयाबीन व उडीद पिकाची होळी करुन शासनाचा निषेध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला.

  उस्मानाबाद जिल्हयातील सर्वच खरीपाची पिके अतिवृष्टी पावसामुळे नष्ट झाली आहेत. अनेक नदीकाठच्या गावात पाणी शिरुन घरांचे आतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची जनावरे, शेतकन्यांचे शेतातील ठिपक सिचने इतर साहित्य पुरात वाहून गेले आहेत. त्या पुरात अनेक जणांचा बळी गेला आहे. याबाबत शासनाकडे वेळोवेळी निवेदन देवून पंचनाम्याची वाट न बघता शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करण्यात आली होती. परंतू शासनाने याची दखल घेतली नाही. अशा नाकारत्या शासनाचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकसान झालेल्या शेतकन्याच्या सोयाबीन, उदीड पिकाची होळी करून शासनाचा जाहिर निषेध करण्यात आला. शासनाने आमच्या या निवेदनाची तात्काळ दखल घेवून येणाऱ्या चार दिवसात शेतकन्याच्या व नुकसानग्रस्ताच्या बँक खात्यावर सरळ मदत हेक्टरी ५० हजार रुपये जमा करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हयातील कृषी अधिकाऱ्यांना व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याच दालनात रोखून धरण्यात येईल, यावेळी काही अनुचित घडल्यास याची जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे

 यावेळी राजेंद्र गपाट , पाशाभाई शेख , राहूल बचाटे, गोपाळ घोगरे, वैशालीताई गायकवाड, निलेश जाधव, शिवानंद ढोरमारे ,  दत्ता बाँदर ,सागर बारकुल  ,संजय पवार  रामभाऊ मोटे आदींची उपस्थिती होती. 

 
Top