उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब-लातूर रस्त्याचे काम हायब्रीड अन्युटी योजनेअंतर्गत चालू काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूकीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यासाठी हे काम तात्काळ चालू करण्यात यावे, अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मंगळवारी (दि.14) जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सन 2019-20 मध्ये कळंब-लातूर रस्त्याचे काम हायब्रीड अन्युटी योजनेअंतर्गत चालू झाले होते. परंतू गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचे काम थांबविण्यात आले आहे. काम थांबविल्यामुळे काही ठिकाणी एका बाजुने काम पुर्ण झाले व दुसर्‍या बाजूने खडी अंतरुन रस्ता खोदून ठेवला आहे. काही भागात रस्ता केवळ उकरुन ठेवला आहे. या सर्व प्रकारामुळे डिकसळ ते रांजणी या साखर कारखाना पट्ट्यातील शेतकरी, कर्मचारी, कामगार व अन्य व्यवसायिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होवून अपघात होवून बर्‍याच जणांचे प्रपंच उध्दवस्त झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे बंद झालेले काम त्वरीत सुरु करण्यात यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, राष्ट्रवादीचे कळंब तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, उपसभापती गुणवंत पवार, संतोष पवार, शाहुराज खोसे, सुरेश टेकाळे, पद्माकर पाटील, सुरेश पाटील, विनायक कवडे, भारत शिंदे, विश्वनाथ धुमाळ, भाऊसाहेब पाटील, अरुण पवार, किरण खोसे, संग्राम खोसे, राजकुमार कवडे, प्रविण शिंदे, सागर चिंचकर, राहुल माळकर, तुषार वाघमारे, नवनाथ मोरे, अच्युत शिंदे, अजित शिंदे, दिनकर शिंदे, सुग्रिव जाधवर, जगदिशचंद्र जोशी, शशिकांत लोमटे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


 
Top