उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यात अद्यापही कोरोना संसर्ग अधिक असल्यामुळे निर्बंध आणखी १५ दिवस लागू असणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवांची दुकाने केवळ ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यात अद्यापही कोरोना संसर्ग अधिक असल्यामुळे निर्बंध आणखी १५ दिवस लागू असणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवांची दुकाने केवळ ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

१५ जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत याची अंमलबजावणी असणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये सामील असलेली सर्व प्रकारची किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, दूध संकलन व वितरण, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने म्हणजेच बेकरी, मिठाई, चिकन, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी विक्रीची दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायत हद्दीच्या क्षेत्रात व हद्द संपल्यानंतर बाहेर दहा किलोमीटर अंतराच्या आतील असलेले सर्व पेट्रोल पंप हे केवळ सकाळी ७ ते ११ वाजेच्या दरम्यान सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सर्व बँका डाक विभागाच्या सेवा दुपारी २ पर्यंत नागरिकांसाठी सुरू ठेवता येतील. दोननंतर त्या बंद करून अंतर्गत कार्यालयीन कामकाज करता येईल.

प्रकारची किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, दूध संकलन व वितरण, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने म्हणजेच बेकरी, मिठाई, चिकन, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी विक्रीची दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायत हद्दीच्या क्षेत्रात व हद्द संपल्यानंतर बाहेर दहा किलोमीटर अंतराच्या आतील असलेले सर्व पेट्रोल पंप हे केवळ सकाळी ७ ते ११ वाजेच्या दरम्यान सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सर्व बँका डाक विभागाच्या सेवा दुपारी २ पर्यंत नागरिकांसाठी सुरू ठेवता येतील. दोननंतर त्या बंद करून अंतर्गत कार्यालयीन कामकाज करता येईल.


 
Top