उस्मानाबाद / प्रतिनिधी -

उस्मानाबाद जिल्हयातील जनतेने शिवसेने तिन आमदार आणि एक खासदार निवडून दिले. तरी संकटाच्या काळात उस्मानाबाद जिल्हयातील जनतेच्या मदतीला कोणीच धावून येंत नाही.कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हयात येवढी बिकट परिस्थिती असताना सरकारी पक्षाचे तिन आमदार आणि एक खसदार काय झोपा काढताय काय? आसा सवाल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केला आहे. आशा संकटाच्या काळात तुम्ही जनतेला सहकार्य करत नाहीत तुम्हालाही जनता कदापी माप करणार नाही. असे मत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातुन व्यक्त केले आहे.

महाविकास आघाडी सरकारने या कोरोना महामारीच्या अभूतपूर्व आपत्कालीन काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना वार्यावर सोडून दिले आहे- मनाची नाही तर ३ आमदार व १ खासदार निवडून देणार्या जनाची तरी लाज वाटू द्याण् जिल्ह्यातील शिवसेनाए राष्ट्रवादी व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना खुला सवाल आहे कीए तुम्ही सर्व मूग गिळून गप्प का ?

 उस्मानाबाद जिल्ह्यातील कालच्या उपलब्ध आकडेवारी नुसार कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २९०७७ झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ५७९५ आहेण् कालपर्यंत जिल्ह्यात ६९३ कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहेण् जिल्ह्याचा मृत्यू दर राज्यांपेक्षा जास्त आहेण् जिल्हाभरात २५०० च्या आत चाचण्या होऊन देखील ६५३ नवीन रुग्ण काल एका दिवसात सापडलेए तर २० कोरोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहेण् इतर जिल्ह्याच्या तुलनेत उस्मानाबादला अत्यंत कमी प्रमाणात रेमिडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहेण् उमरगाए तुळजापूरए परांडा या उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी तर अनेक दिवसांपासून पुरवठाच होत नाहीण् जिल्हा रुग्णालयए उस्मानाबाद येथेही गरजेच्या ५०ः पण पुरवठा होत नाहीण् जिल्हा रुग्णालय आवारातील ऑक्सीजन प्लांट काही महिन्यांपूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित असताना काल कसे बसे याचे काम पूर्ण झालेण् जिल्हाभरात डॉक्टरांचा तुटवडा जाणवत आहेण् रुग्णांना ऍडमिट करून घेण्यासाठी बेड शिल्लक नाहीत अशी आरोग्य यंत्रणेची बिकट अवस्था झालेली आहेण् रुग्ण सापडल्यानंतर त्या परिसरात मायक्रो कंन्टेन्टमेन्ट झोन तयार करणेए संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंगए टेस्टिंग आणि विलीगीकरण करणे व इतर अनुषंगिक गोष्टी समाधानकारक रीत्या होताना दिसत नाही.

 अशा अभूतपूर्व परिस्थितीत राज्य सरकार व राज्य सरकारचा प्रतिनिधी असल्यामुळे  पालकमंत्र्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे गरजेचे असतेण् २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री पुन्हा जिल्ह्यात येवु शकले नाहीतण् त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड.१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली अभूतपूर्व व प्रचंड अशी आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री आजारातून बरे होई पर्यंत इतर मंत्री महोदय उस्मानाबाद जिल्ह्यासाठी प्राधिकृत करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केली होतीण् २६ जानेवारी नंतर अद्याप जिल्ह्यात कोणतेही मंत्री आले नाहीतण् इतर जिल्ह्यात पालकमंत्री दर आठवड्याला बैठका घेऊन जनतेच्या व प्रशासनाच्या अडचणी जाणून घेतात त्या सोडविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करतातण् या आणीबाणीच्या काळात एकाही मंत्र्यांनी जिल्ह्यातील अडचणींबाबत येथे येऊन आढावा घेतलेला नाहीण् जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार जनतेने निवडून दिलेले असताना शिवसेनेच्या सरकारने जनतेला वार्यावर सोडून दिल्यामुळे जनता वैतागलेली आहे. मनाची नाही तर ३ आमदार व १ खासदार निवडून देणार्या जनाची तरी लाज वाटू द्याण् या अक्षम्य दुर्लक्षा बाबत उस्मानाबादकर सत्ताधार्यांना कदापी माफ करणार नाहीतण् जिल्ह्यातील शिवसेनाए राष्ट्रवादी व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना तुम्ही सर्व मूग गिळून गप्प काघ् असा सवाल उपस्थित करत या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वर व्हाट्सअँप वर काळ्या रंगाचा डीपी ध् स्टेटस ठेवून निषेध व्यक्त करावा असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

 
Top