उस्मानाबाद / प्रतिनिधी

 नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यात शिवसेनाच अग्रस्थानी राहिली, असा दावा तालुकाप्रमुख सतीश सोमाणी यांनी केला.

दैनिक लोकराज्यशी बोलताना ते म्हणाले,कीपक्षप्रमुख अर्थात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसैनिकही ताकदीने कामाला लागला आहे.

त्याचे प्रतिबिंब ग्रामपंचायत निवडणुकीत उमटले. उस्मानाबाद तालुक्यात झालेल ६५ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच क्रमांक एकवर राहिली. शिवसेनेच्या ताब्यात तब्बल ३२ ग्रामपंचायती आल्या आहेत. या सर्व ठिकाणी शिवसेनेचे सरपंच झाले आहेत. या सर्वांनी आता लोकाभिमुख कामाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सोमाणी यांनी केले.

 
Top