उस्मानाबाद/प्रतिनिधी  समाजमाध्यमांमध्ये कोविड लस घेतली तरी जिल्हाधिकाऱ्यांबना कोरोणा लागण झाली अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. त्यातून लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दोन डोस घेतल्या नंतर ही मास्क बंधनकारक लावणे आवश्यक  आहे तरच कोरोणा दुर रहातो असे सांगितले  आहे
मागील काही दिवसांपासून  शासकीय  कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली. लोक मास्क न घालता गर्दी करत. आपण त्यांना सांगितल्यावर मास्क लावत. पण माझ्याबाबतीत तोवर व्हायचा तो परीणाम झालाच असे म्हणावे लागेल. त्यामुळे नो मास्क नो एन्ट्री आवश्यक आहे.मी दोन आठवड्यांपूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पण कोविड विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात . त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने यासाठीच दिल्या आहेत. कोणतेही लक्षण अंगावर न काढता तपासणी करून घ्या.मला समाधान आहे की उस्मानाबाद जिल्ह्यात मागील सहा महिन्यात ज्या सोयीसुविधा आपण शासकीय रुग्णालयांत निर्माण केल्या त्याचाच लाभ मलाही मिळत आहे. मागील आठवडाभरात आपण कोविड च्या दुसऱ्या लाटे साठी तयार सुरू केली आहे.
फेब्रुवारी 2020 मध्ये आपल्याकडे केवळ 60 ऑक्सिजन बेडस, 18 व्हेंटिलेटर उपलब्ध होते. आज फेब्रुवरी 2021 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात 1100 ऑक्सीजन सपोर्टेड बेडस् आहेत. 196 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. इतरही अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. दुसऱ्या लाटेसाठी तयारी करताना अँटीजन किट्स, N95, नवीन ऑक्सिजन सिलेंडर, नवीन 200 ऑक्सिजन लाईन, 2 डी इको व इतर नवी यंत्रसामग्री याबाबत नियोजन केलेले आहे.960 सीसीसी बेड्सची सुविधा पूनःस्थापित करण्याचे काम वेगात सुरू आहे.लक्षणे असणाऱ्या सर्व व्यक्तींची चाचणी, विलगीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसींग ही प्रक्रिया वेगात राबवायची आहे. लोकांनी कोणतेही लक्षण अंगावर काढू नये यासाठी सरकारी खाजगी हॉस्पिटल्स व सर्वांनीच जनजागृती केली पाहिजे.किंबहुना मी लस घेतली आहे त्यामुळे ताप आला तरी कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही असे मानून दुर्लक्ष केले असते तर माझ्याकडून लोकांना संसर्ग झाला असता. माझ्यासोबत माझी पत्नी प्रियांका बोकील याही कोविड पॉझिटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे कुटुंबीयांची कोविड तपासणी महत्वाची ठरते. यामुळे नागरिकांना पुनश्च आवाहन की कोणतेही लक्षण अंगावर काढू नये. लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी.काल केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची एसओपी प्राप्त झाली आहे. त्या एसओपी आणि  राज्य शासनाच्या विविध सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.आपण सर्वजण मागील एक वर्षापासून कोविडच्या साथीचा सामना करत आहोत. इतिहासाला नोंद घ्यावी लागेल इतके मोठे  काम, महाराष्ट्रातील यंत्रणांनी केले आहे. पुढेही करत राहू. अशी सदिच्छा श्री .कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केली आहे.
 
Top