तुळजापूर / प्रतिनिधी

तालुक्यातील केमवाडी गावची लोकसंख्या केवळ दीड हजार ते दोन हजार इतकी मात्र गाव शेती उत्पन्नात परिसरात सरस आहे,

गावातील पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलापासून सत्तर वर्षा पर्यंतचे बुजुर्ग शेतीकामात मोठे कष्ट करणारे, खरिपातील सोयाबीन ,उडीद, काढणीनंतर  येथील शेतकऱ्यांची  कांदा उत्पादनाला अधिक पसंती असते,केमवाडी गावात जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांदा पिकाची लागवड केल्याचे पाहायला मिळते आहे,गावातील ८०% टक्के लोकांकडे स्वतःच्या मालकीची शेती आहे, स्वतःच्या मालकीच्या शेतात कांदा पिकाचे उत्पन्न घेणारे शेतकरी भरपूर आहेत ,पण ज्यांना शेती नाही त्यांनी देखील बटई पद्धतीने शेतकऱयांच्या  शेतात कांद्याची लागवड करून विक्रमी कांद्याचे उत्पन्न घेताना दिसतात,या गावात कांदा दिवाळीनंतर देखील साठवून ठेवला जातो साठवलेल्या कांद्याला चांगला भाव मिळावा हीच शेतकरी वर्गाची अशा असते, येथे अनेक शेतकरी कांदा उत्पादनातील तज्ञ असून अतिशय नियोजनबद्ध  व्यवस्थापन करुन कांदा उत्पन्न घेतले जाते, गावातील अनेक शेतकऱ्यांना कांदा उत्पादनातून लाखो रुपयांचा आर्थिक लाभ झालेला आहे, सोलापूर ,हैदराबाद ,बेंगलोर, आधी मार्केटमध्ये केमवाडी चा दर्जेदार कांदा म्हणून स्वतःच्या कांदा उत्पादनाची येथील शेतकऱ्यांनी ओळख निर्माण केली आहे,नोव्हेंबर महिण्यात गावात शेकडो हेक्टर कांद्याची लागवड झाली असून यापुढे देखील डिसेंबर-जानेवारी मध्ये देखील कांदा लागवड होण्याची शक्यता आहे


 
Top