उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दूल सत्तार  आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. ना. अब्दुल सत्तार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गावांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

बेगडा या गावात मोठी वाहने जाणे शक्य नसल्याने  अब्दुल सत्तार मोटर सायकल वरून शेताच्या बांधावर गेले आणि तेथील शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केले. यावेळी उस्मानाबाद चे आमदार कैलास पाटील यांनी सदरील मोटर सायकल चालवली. आपल्या शेतातील नुकसानीचे पाहणी करायला मंत्री येतात की नाही या चिंतेत बसलेल्या शेतकऱ्यांना दोन नेते मोटर सायकल वरून शेतात पाहणी व धीर देण्यासाठी येतात या वरून सरकारला शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ दिसून येते.

 
Top