तुळजापूर  /प्रतिनिधी-
 कोरोना सोबत चालयाचे हा मंञ जपत लोक लाँकडाऊन च्या दुसऱ्या दिवशी मंगळवार दि. 2रोजी रस्त्यावर आल्याने  शहरासह तालुक्यात व्यवहार आणखीण  सुरुळीत होण्यास आरंभ झाला आहे. रविवार- सोमवार मान्सुनपुर्व दमदार पाऊस झाल्याने शहरासह ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडल्याने प्रथमच शहरातील रस्त्यावर लोकांची वर्दळ दिसुन आली. आज प्रामुख्याने खते,  मोबाईल,  किराणा दुकाने , बँका येथे मोठी गर्दी दिसुन आली. तसेच आज देविचा वार मंगळवार असल्याने पंचक्रोषीतील अनेक भाविकांनी नवदांम्पत्यांनी देवी दर्शनासाठी राजेशहाजीमहाध्दार, राजमाता जिजाऊ महाध्दार समोर गर्दी केली होती. महाध्दारातुन शिखर दर्शन घेवु देवीदर्शन घडल्याचे मानून गावी रवाना होत होते. सध्या भाजी मार्कट ही शुक्रवार पेठ भागात चालु असुन येथे शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी येत असुन शहरवासिय भाजी खरेदी साठी जात आहेत. प्रामुख्याने शिवाजी चौक ,  गोलाई  बसस्टँन्ड चौक , दिपक चौक , नळदुर्ग रोड,  लातूर व उस्मानाबाद रोड,  कमानवेस , आर्य चौक भागात गर्दी दिसुन आली या भागातील दुकाने मोठ्या संख्येने उघडले होते. इतरञ भागात माञ दुकाने बंद असल्याने गर्दी दिसुन आली नाही.

कृषी दुकांनान समोर गर्दी
दोन दिवस मान्सुनपुर्व दमदार पाऊस झाल्याने  शहरातील कृषी केंद्र दुकांनावर शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते खरेदीसाठी मोठ्या संखेने गर्दी केली होती. सोशल डिस्टंन्स पाळुन बी-बियाणे, खते खरेदी करीत होते.

 गर्दीवर पोलिसांची नजर!
तुळजापूर पोलिसांनी आज दिवसभर गर्दीच्या रस्त्यावर नजर ठेवुन होते गर्दी होणाऱ्या जागी पोलिस तैनात असल्याने सोशल डिस्टंन्स पाळला जात होता. दुचाकी, चारचाकी वाहने थांबवुन त्यातील संख्या तपासुन मगच त्यांना पुढे प्रवासस सोडले जात होते.

 
Top