उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना वायरसमुळे गेल्या दोन महिन्यापासून देशात रेल्वे सेवा बंद होती, येत्या १ जून पासून रेल्वे मंत्रालयाने सर्व विभागात २०० मेल एक्सप्रेस सुरू करण्यात परवानगी दिली आहे. परंतु मराठवाडा विभागात मात्र नांदेड विभागातून रेल्वे सुरू करण्यात परवानगी दिली आहे. तर लातूर-उस्मानाबाद या जिल्हयात मात्र एक ही रेल्वे सेवा सुरू करण्यास परवानगी न दिल्याबद्दल रेल्वे विभागाचा तीव्र शब्दात निषेध     सचिव रेल्वे संघर्ष समिती उदगीर सल्लागार  सदस्य द.म.रेल्वे सिकंदराबाद तथा अभ्यासक मोतीलाल डोईजोडे  यांनी करून बिदर-लातूर-मुंबई मार्गे उस्मानाबाद या रेल्वेस पण मंजुरी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
 रेल्वे अभ्यासक मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले की,  रेल्वे मंत्रालय दिल्ली व रेल्वे बोर्ड यांच्या आदेशाने 1 जून 2020 पासून देशभरात 200 मेल एक्सप्रेस स्पेशल म्हणून चालविणार आहे. आपल्या भागातील रेल्वे द.म. रे््‌च्या अखत्यारीत येत असून ते ऐकून 9 रेल्वे सुरू करत आहेत त्यातील फक्त एक रेल्वे नांदेड ते अमृतसर धावणार असून नांदेड,परभणी,जालना व औरंगाबाद विभागातील मराठवाड्याच्या प्रवासायांची सोय होणार आहे तर प्रसिद्धीपत्रकात नमूद केले प्रमाणे एकही रेल्वे विकाराबाद-बिदर-उदगीर-परळी वैजनाथ किंवा विकाराबाद-बिदर-उदगीर-लातूररोड-लातूर-उस्मानाबाद-कुर्डुवाडी मार्गावर सोडली नाही त्याबद्दल दक्षिण मध्य रेल्वेचा  त्यांनी निषेध केला आहे पुणे मुंबईत  अनेक उद्योग  सुरू  झाले आहेत अनेक  लोकाना पोटापाण्यासाठी काम करणे आवश्यक  आहे त्या मुळे बिदर-लातुर -मुंंबई रेल्वे सेवा सुरु करावी  अशी मागणी करण्यात आली आहे

 
Top