तुळजापूर / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयामध्ये  सन २०१८-१९ साठी जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम योजने अंतर्गत जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून तीन गांवाची  निवड झाली आहे. यामध्ये  आपसिंगा (ता. तुळजापूर), डकवाड (ता. उस्मानाबाद),  सोनगाव (ता. वाशी)  या तीन गावची जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून निवड केली असुन या तिन्ही ग्रामपंचायतला चाळीस लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तसेच  या तिन्ही ग्रामपंचायतींना साडेतेरा लाख रुपये मिळणार आहे.
आपसिंगा ग्रामपंचायत हे बक्षीस मिळण्यासाठी सरपंच वैशाली शंकर गोरे  व ग्रामपंचायत सदस्य,  ग्रामसेवक चैतन्य गोरे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

 
Top