उस्मानाबाद/प्रतिनिधी-
नामांकित बालाजी अमाईन्स कंपनीकडून समाजसेवा निधीतून बेंबळी येथील जिजामाता कन्या प्रशालेस २० ड्यूयल डेस्कची भेट देण्यात आली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक रामजी रेड्डी यांनी कंपनी चालविताना आलेल्या नफ्यातून आपण ही ग्रामीण भागातील लोंकाच देण लागतो, या भावनेतून कंपनीच्या समाजसेवा निधीतून या शाळेस भेट देण्यात आली आहे.
यावेळी त्याच्यासोबत बिराजदार हे ही होते. बालाजी अमाईन्स कंपनीचे व्यवस्थापक रामजी रेड्डी यांनी विद्याथ्र्यांना आवाहन करताना सांगितले की, विद्याथ्र्यांनी मन लावून अभ्यास करावा, कोणतीही गोष्ट अशक्य नसते आणि अभ्यास करण्याचे वय हे असते, या वयात अभ्यास केल्यास आपली प्रगती कोणीही रोखू शकत नाही, असे सांगितले. यावेळी जिजामाता कन्या प्रशालेची मुख्याध्यापिका श्रीमती आर.बी.गोडबोले मॅडम, इतबारे पी.एस, सोनटक्के के.एस, खापरे सी.डी, गंभीरे शिवाजी, लोंढे भारत, सर्जे हिराजी यांच्यासोबत शाळोतील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशालेच्या वतीने श्री खापरे सरांनी आभार मानले.
 
Top