तुळजापूर (प्रतिनिधी)- जगात विविध देश आहेत, विविध देशातील लोकांच्या वेगवेगळ्या मातृभाषा आहेत. पण आपली मातृभाषा कोणती, तिचे महत्त्व काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. हा दिवस कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. आज मराठी भाषा मोठी आहे, ती केवळ एक भाषा नाही; ती आपली संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक आहे. असे प्रतिपादन सोलापूर येथील ज्येष्ठ व प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागामार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा.डॉ.शिवाजीराव देशमुख पुढे म्हणाले की, साहित्य, नाटक, कादंबरी, कविता, लोकसाहित्य या सर्व क्षेत्रांत मराठीचे मोठे योगदान आहे. असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बापूराव पवार यांचेही अध्यक्षीय भाषण झाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवहार विभुते तर आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी जगताप यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मंत्री आडे, डॉ. निपाणीकर, प्रा. वनिता बाबर, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी इत्यादींची सहकार्य लाभले, या कार्यक्रमास विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. जीवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
