धाराशिव (प्रतिनिधी)- भूम पंचायत समिती कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 9/09/2025 रोजी सायंकाळी मौजे ईट शिवारातील ईट ते जातेगाव जाणारे रोडवर किनारा हॉटेलचे जवळ श्रीकृष्ण अर्जुन बांगर वय 39 वर्ष, व्यवसाय नोकरी रा. पाटोदा ता. पाटोदा जि. बीड व त्यांचे सहकारी रविन्द्र राख त्यांचे बोलेरो गाडी मध्ये जात असताना गाडी थांबवण्यास सांगुन अनोळखी चार इसमांनी जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करून जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांना गोपनीय माहितीदाराकडून यातील संशयित आरोपी बाबत माहिती मिळाली. त्यांनी आरोपी नामे सलमान पठाण, रा. भूम व रितेश अंधारे, रा. हाडोंग्री यांना येरमाळा उड्डाणपुलाच्या खालून ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्ह्या संदर्भात अधिक चौकशी केली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन त्यांचे अन्य साथीदारांची माहिती दिली. तसेच पैशाच्या मोबदल्यात सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्यावरून वर नमूद दोन आरोपींना वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे वाशी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार,पोलीस हावलदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, दयानंद गादेकर,चालक पोलीस अंमलदार नागनाथ गुरव, रत्नदीप डोंगरे, प्रकाश बोईनवाड यांचे पथकाने केली आहे.