धाराशिव (प्रतिनिधी)- लोकशाही टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तींच्या संघर्षाची आठवण ठेवणे हे आजच्या तरुण पिढीचे कर्तव्य आहे.आणीबाणीच्या काळात संविधानिक हक्क आणि व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले असताना काही निर्भय नागरिकांनी त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत केवळ स्वतःसाठी नव्हे,तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला.त्यासाठी त्यांना तुरुंगवासही पत्करावा लागला. आणीबाणीत लोकशाहीकरिता लढा देताना कारावास भोगलेल्या व्यक्तींचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या घटनेला आज ५० वर्ष पूर्ण झाल्यानर लोकशाहीकरिता लढा देताना कारावास भोगलेल्या व्यक्ती व वारसदारांचा सन्मान आयोजित कार्यक्रमात करतांना श्री.पुजार बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,तहसीलदार ज्योती चव्हाण व अभिजीत जगताप यांच्यासह जिल्ह्यातील आणीबाणीत सहभाग घेतलेले विविध नागरिक,त्यांचे वारसदार यांच्यासह नागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
.पुजार म्हणाले की,आज आपण ज्या मोकळ्या वातावरणात राहतो, बोलतो,लिहितो,ते सहज मिळालेलं नाही.त्यासाठी अनेकांनी संघर्ष केला आहे.त्यांची ही आठवण आम्हाला लोकशाही मूल्यांच्या प्रती सजग ठेवते.हे मूल्य जपणं हेच त्यांच्याप्रती खरं आदर आहे.” असेही ते म्हणाले.
सन १९७५ च्या आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या आणि त्या लढ्यात कारावास भोगलेल्या संघर्षमूर्तींचा जिल्हा प्रशासनाने सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मुरलीधर कुलकर्णी म्हणाले, “१९७५ मध्ये जेव्हा आणीबाणी जाहीर झाली,तेव्हा आमच्यासमोर दोनच पर्याय होते – एकतर गप्प राहणे किंवा सत्यासाठी लढणे.आम्ही दुसरा मार्ग निवडला.पोलिसांच्या मारहाणीला सामोरे जात,आम्ही आंदोलन केले आणि जेलमध्ये जाऊन बसलो.आज या लढ्याची आठवण घेत जिल्हा प्रशासन आमचा सन्मान करत आहे,याचा आम्हाला मोठा अभिमान वाटतो.असे श्री. पुजार म्हणाले.
तुरुंगवास भोगलेले श्री.बलभीम मुळे म्हणाले,“आम्ही केवळ भाषणं करून थांबलो नाही,तर भूमिगत जाऊन जनजागृती केली.लोकांना सत्य समजावून सांगितलं.त्या काळात फोन टॅपिंग, संचारबंदी,माध्यमांवरील निर्बंध – हे सगळं झेलत आम्ही लढा दिला.तो संघर्ष विसरता येणार नाही.
या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.यावेळी आणीबाणीच्या काळात घडलेल्या घटनांची माहिती देणारी प्रदर्शने लावण्यात आली होती. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
सन १९७५ ते १९७७ या कालावधीत घोषित झालेल्या आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींची नावे श्री.श्रीमंत बाबुराव दम,रा.आरळी(बु) ता.तुळजापूर,श्री.मुरलीधर श्रीनीवासराव कुलकर्णी, रा.घर नं. २० वार्ड नं.१२,'रविंद्र निवास' शिवाजी चौक,उमरगा,ता.उमरगा, श्री. प्रभाकर बाळासाहेब जाधव,रा. देवसिंगा (तुळ), ता.तुळजापूर,श्री. अंगद शिवराम माळी,रा.अराधवाडी, तुळजापूर ता.तुळजापूर,श्री. हरिदास बाबूराव वडणे,रा.माळुंब्रा,ता. तुळजापूर,श्री.सुभाष काशिनाथ छत्रे, रा.तुळजापूर,ता.तुळजापूर,बलभीम गोपीनाथ मुळे,राजगड नवानी नळदुर्ग,ता.तुळजापुर,श्री.डॉ. चंद्रकांत रंगनाथ महाजन,'धन्वंतरी' मेन रोड,पोलीस स्टेशनसमोर उमरगा, ता.उमरगा,श्री.श्रीहरी नारायण आचार्य,आचार्य गल्ली,आचार्य वाडा,ता.जि.धाराशिव,दिवंगत हरीभाऊ दामोदर गवते यांच्या पत्नी रुक्मिणीबाई,रा.तुळजापूर, ता.तुळजापूर,दिवंगत शिवाजीराव माधवराव भोसले यांच्या पत्नी लक्ष्मीबाई,रा.तुळजापूर,ता. तुळजापूर,दिवंगत उत्तमराव भिमराव पेंदे यांच्या पत्नी सुमनबाई,रा. तुळजापूर,ता.तुळजापूर,दिवंगत अशोकराव आंबादास संतमुर्णी (ताकमोघे) यांच्या पत्नी सुमनबाई, रा. तुळजापूर,ता.तुळजापूर,जि. उस्मानाबाद,दिवंगत ज्ञानदेव उर्फ नामदेव मरीबा कांबळे यांच्या पत्नी बाळूबाई रा.तुळजापूर,ता.तुळजापूर, जि.धाराशिव,दिवंगत नेताजी माधवराव चोपदार यांच्या पत्नी शोभाबाई,रा.तुळजापूर,तुळजापूर, जि.धाराशिव,दिवंगत रावजी रंगनाथ भोसले यांच्या पत्नी सिंधूबाई, रा.तुळजापूर,ता.तुळजापूर,दिवंगत अच्युतराव मनोहरराव भोसले यांच्या पत्नी हिराबाई रा.तुळजापूर, ता.तुळजापूर,दिवंगत महादेव लक्ष्मण मोगरकर यांची वारस पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई महादेव मोगरकर, रा.तुळजापूर,ता.तुळजापूर,दिवंगत श्री.गणपत अंबादास फडकरी यांच्या पत्नी सरस्वतीबाई रा.कमान वेस, तुळजापूर,ता.तुळजापूर,दिवंगत श्री.मारुतीराव देवीदास क्षिरसागर यांच्या पत्नी इंदुमतीबाई रा.तुळजापूर ता. तुळजापूर,दिवंगत भिमराव पिराजी व्हरकट यांच्या पत्नी विमलबाई रा.आरळी बु ता.तुळजापूर,दिवंगत रावण विठ्ठलराव भोसले यांच्या पत्नी सुमनबाई रा.तुळजापूर ता.तुळजापूर, दिवंगत मनोहर माधव बामणकर, यांच्या पत्नी पद्मीनीबाई रा.आरळी (बु), ता.तुळजापूर,दिवंगत विनायक नागनाथ शिंदे यांच्या पत्नी शेषाबाई रा.बसवंतवाडी,ता.तुळजापूर २७.दिवंगत संजय जीवनराव दहिटणकर यांच्या पत्नी सुचिताबाई फरशी गल्ली,बालाजी मंदीरजवळ, धाराशिव,दिवंगत सुभाष विष्णुपंत कुलकर्णी यांच्या पत्नी सुमती उर्फ विमलबाई रा.तुळजापूर,ता. तुळजापूर,दिवंगत विष्णू ज्ञानदेव सोनवणे यांच्या पत्नी केवळबाई रा.शिराढोण ता.तुळजापूर आदींचा गौरव करण्यात आला.