कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील तहसीलदार मा.हेमंत ढोकले यांना लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने दि.19 मे 2025 रोजी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, श्रावण बाळ योजना,संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनेची प्रकरणे प्रलंबित असून सदरील प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. तसेच  महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ थेट कर्ज योजनेचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत, समाज कल्याण विभागाचा निधी इतरत्र कोणत्याही योजनेसाठी वापरण्यात येऊ नये, ग्रामपंचायत मार्फत चालू असलेले आपले सरकार सेवा केंद्र पुर्ववत चालू करण्यात यावेत, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी लवकरात लवकर करण्यात यावी, शेतकऱ्यांना खते व बी बियाणे पेरणीपूर्वी देण्यात यावेत, पीएमईजीपी व सीएमईजीपी या योजनेची कर्जमाफी करण्यात यावी, अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी व जात सिद्ध करण्यासाठी लाभधारकांना उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून नाहक त्रास होत आहे. तर इतर जिल्ह्यात जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कुटुंबातील रक्त नात्यातील एका सदस्याचे जात प्रमाणपत्र जोडले असल्यास जात प्रमाणपत्र दिले जाते. परंतु कळंब उपविभागीय कार्यालयात अनेक कागदपत्राची मागणी होत असल्यामुळे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कमीत कमी आवश्यक कागदपत्रे घेऊन जात प्रमाणपत्र निर्गमित करावे. अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर  लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, मुकेश गायकवाड, दीपक हौसलमल, बप्पा सावंत, शहर अध्यक्ष नागेश धिरे, विशाल शिंदे, सुधाकर मुळीक, बाबुराव गुंजाळ, व मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे यांच्या स्वाक्षरी आहेत आहेत.

 
Top