उमरगा (प्रतिनिधी)-  शहरातील आठ ते दहा दिवसापासून चालत असलेल्या लाईटच्या लपंडावा बद्दल महावितरणच्या अभियंत्यांना जाब विचारण्यासाठी काँग्रेसचे युवा नेते अश्लेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्ट मंडळाने निवेदन दिले. 

वेळेवर अडचणी समजून घेऊन मेन्टेनन्सचे काम पूर्ण करून शहरातील वीजपुरवठा सुरळीत द्यावा यासाठी शिष्टमंडळाने उपअभियंता मोरे यांचा उपहासात्मक सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे नेते नानाराव भोसले, उमरगा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विजय वाघमारे, युवक काँग्रेस धाराशिव चे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष विजयजी दळगडे, ॲड. पोद्दार, बाबा मस्के, तालुका उपाध्यक्ष गुरव, काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल सरपे, युवक शहराध्यक्ष इनामदार, प्रकाश चव्हाण, निजामभाई व्हंताळे, विशाल काणेकर, जालिंदर सोनटक्के, जिवन सरपे, तसेच बरेच पदाधिकारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top