तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी  तुळजाभवानी मातेच्या वर्षातुन दोन मोठ्या याञा भरतात त्या पैकी अश्विनी पोर्णिमे दिनी भरणारी याञा व  वर्षातील दुसरी सर्वात मोठी “चैत्र पौर्णिमा यात्रा 11 ते 14 एप्रिल दरम्यान साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दि. 11 एप्रिल रोजी पहाटे 1 वाजल्या पासुन देविदर्शनाथ भाविकांना घाटशिळ वाहनतळ  बिडकर तलाव येथुन मंदीरात दर्शनार्थ सोडले जाणार आहे.

दरम्यान,  यंदा तापमान चाळीस अंशावर पोहचल्याने व भाविकांच्या वाढणाऱ्या  गर्दीच्या पार्श्वभूमीवर चैत्र पौर्णिमा याञा नियोजन पुर्वक पार पाडणे प्रशासना समोर आव्हान असणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवानंतर सर्वात मोठी यात्रा म्हणून चैत्र पौर्णिमा यात्रेकडे पाहिले जाते. उन्हाळ्याची सुटी तसेच शेतीची बहुतांश कामे आटोपली असल्याने चैत्र पौर्णिमा यात्रेला भाविकांची विशेषता ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी भाविकांची मोठी गर्दी असते. ही याञा ग्रामीण  भागातील शेतकरी वर्गासाठी श्रमपरिहार करणारी असती. कारण शेतीचे रबी काढणी कामे संपलेले असतात. या याञेस पळती याञा म्हणून ही संबोधली जाते. कारण यात सहभागी होणारा भाविक प्रथम शिखर शिंगणापूरच्या शंभुमहादेवाचे दर्शन घेतो. नंतर तो चैञी एकादशीला श्रीविठ्ठल रुकमीणी दर्शनार्थ दाखल होतो. तेथुन चैञी पोर्णिमेला कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी दर्शन घेवुन नंतर तो येरमाळ्याच्या येडाईचा दर्शन घेताच या याञेचा सांगता होतो.

उन्हाळ्यात  भाविकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासह कमी कालावधीत सुलभ दर्शन उपलब्ध करण्याचे प्रशासनासमोर आव्हान असणार आहे. चैत्र पौर्णिमा यात्रेच्या नियोजनासाठी मंदिर संस्थानसह नगरपालिका, पोलिस, राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, महावितरण आदी विभागांना उपाययोजना तयारीत आहेत. व्यापारी, पुजारी वृंद ही तयारी करीत आहे. तुळजाभवानी मातेचे चैत्र पौर्णिमा विधी 12 एप्रिल रोजी असून रात्री पौर्णिमेनिमित्त छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. छबिना मिरवणुकीनंतर महंतांच्या जोगव्याने पौर्णिमेची सांगता होईल. चैत्र पौर्णिमा यात्रेला  मराठवाडातील भाविकांचे मोठी उपस्थिती असते. मराठवाडातुन जगण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे, नाशीक येथे गेलेली मंडळी  या याञेत आवर्जुन लाखोंच्या संख्येने सहभागी  होतात. यंदा कडक उन्हाळा असल्याने भाविकांना पाणी सह आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.


 
Top