तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या चैञी पोर्णिमा याञेच्या पार्श्वभूमीवर भाविक प्रवाशांचा संखेत वाढ होणार असल्याने चैञी पोर्णिमा कालावधीत  जुने बसस्थानक वापर करण्याची मागणी होत आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे दोन बसस्थानक असुन जुने बसस्थानक नव्याने बांधले जात आहे. नव्वद टक्के काम पुर्ण झाले आहे.

लातुर रोडवर असणारे नवे बसस्थानक येथुन सध्या सर्वच बसेस सोडल्या जात असल्याने येथे कायम प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यात चैञी पोर्णिमेला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार असल्याने चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने चैञी पोर्णिमे कालावधीसाठी जुने बसस्थानक वापर करावा. यामुळे चोऱ्या कमी होवुन भाविकांची गोरसोय दुर होणार आहे.

 
Top