भूम (प्रतिनिधी)- ज्यांचा थोडे गुण कमी पडल्यामुळे सत्कार झालेला नाही त्यांनी स्वतःला कमी न समजता मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. यश अपयश हे कायमस्वरूपी नसते त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक संजय जराड यांनी केले.
येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे होते. प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूसाहेब औताडे, उपाध्यक्ष ॲड. विठ्ठल खवले गटविकास अधिकारी मोहन राऊत, पोलीस उपनिरीक्षक संजय जराड, गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत साळुंखे ,केंद्रप्रमुख भास्करराव जाधव उपस्थित होते. प्रशालेचे भूम शहरातील इतर शाळपेक्षा सर्वाधिक 11 विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच विज्ञान प्रदर्शन ,शिवजयंती निमित्त घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा , क्रीडा स्पर्धा या सर्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला पवार काकासाहेब, पाटील दयानंद, पायघन उत्रेश्वर, पवार बापूसाहेब, जोशी अविनाश, गुंजाळ दत्तात्रय, वैशाली विधाते, पवार नितीन, शिंदे कैलास, साठे हरीश, माने मॅडम व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले. तर आभार प्रदर्शन अविनाश जोशी यांनी मानले.