धाराशिव (प्रतिनिधी).- एनव्हीपी शुगर प्रा.लि.जागजी कारखान्याच्या वतीने सन 2024-25 च्या प्रथम गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन 100 रुपये प्रमाणे दुसरा हप्ता गुढीपाडवा सणाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
एनव्हीपी शुगर कारखान्याने प्रथम गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक, तोडणी ठेकेदार, चालक, ऊस उत्पादक शेतकरी, खातेप्रमुख, कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने कमी कालावधीत 1 लाख 2 हजार मे.टन यशस्वी गाळप केले आहे. शेतकऱ्यांना ऊस दिल्यानंतर पंधरा दिवसांत प्रत्येक महिन्याच्या 1 व 16 तारखेला संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात ऊसबिल जमा करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.
तरी ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. तसेच ज्यांनी खाते दिले नाही अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.