धाराशिव (प्रतिनिधी)-केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी प्रगतीची दिशा देणारा अर्थसंकल्प असून शेतकरी, महिला, युवा, गरीब या महत्त्वाच्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केला आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड यांनी दिली.
विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी 600 कोटी तर आपल्या धाराशिव- तुळजापूर रेल्वेसाठी 225 कोटी ची तरतूद केली आहे. यामुळे आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी पूर्ण भारतातील भक्त तुळजापूर मध्ये येतील व यामुळे परिसरातील विकासासह रोजगाराच्या संधी यामुळे निर्माण होणार आहेत.