तुळजापूर  (प्रतिनिधी)-  लोकसभा निवडणुकीनंतर आता  विधानसभा निवडणुकीचे वेध अनेकांना लागले आहेत. त्यादृष्टीने मतदारसंघात इछुक मंडळी कामाला लागले असुन गावपातळीवर नेते कार्यकत्यांची जुळवाजुळव सुरु केली आहे. नेते कार्यकत्यांची जुळवाजुळव सुरु केली असली तरी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी  काय करावे यासाठी माहिती संकलन व मंथन सुरु झाले आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दाखवलेली करामत ही प्रस्थापित नेत्यांना ही चिंता करणारी ठरत आहे. विशेष म्हणजे महायुती, महाविकास आघाडीचे तालुक्यात लोकसभेनंतर समसमान वातावरण निर्माण झाल्याने महाविकास आघाडीसाठी जागा खेचण्यासाठी पक्षांमध्ये तर उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांमध्ये चुरस लागल्याचे दिसुन येत आहे.

भाजपकडुन विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची उमेदवारी जवळपास फायनल आहे. तर भाजपामधून इच्छुकांची संख्या मात्र वाढली आहे. त्यामध्ये ॲड. व्यंकट गुंड,  शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे, सक्षणा सलगर, जीवन गोरे तर ठाकरे गट शिवसेनेच्यावतीने शामल पवार यांच्यासह काही नेते इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत विशेषता काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथा झाल्याने काँग्रेस उमेदवारी बाबतीत सध्या संभ्रमस्था निर्माण झाली आहे. त्यांच्यात इच्छुकांचा संखेत वाढ झाली आहे. हे आणखी काय कमी म्हणून शिवसेना उबाठा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तुळजापूर विधानसमा मतदार संघावर भगवा फडकावून कै. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेचे स्वप्न पुर्ण करणार असल्याचे भाषणा दरम्यान सांगितले. तसेच नुकतेच खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी शरदपवारांची भेट घेतली ही भेट कशासाठी घेतली या बाबतीत ही मतदार संघात चर्चला उधाण आले आहे.

शिवसेना उबाठा या जागेवर दावा तर सांगत नाही ना प्रश्न निर्माण होत आहे. या जागेवर दावा करताना लोकसभेत मला 55 हजार मताचे मताधिक्य मिळाले असे सांगण्याची शक्यता आहे.  विशेषता महाविकास आघाडीमधुन विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीला  इच्छुक मोठ्या संखेने लागले आहेत.  या निवडणुकीत कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल याबाबत बराचसा संभ्रम आहे. महाविकास आघाडीकडुन  उमेदवारी मिळविण्यासाठी काही मातब्बर इच्छुक आहेत. 

 
Top