धाराशिव (प्रतिनिधी)-लोकसभा निवडणूक ही देशाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या सरकारने मागील 10 वर्षांत पूर्वीच्या 50 वर्षांच्या काँग्रेस काळातील विकासाची तुलना करून महायुतीच्या पाठीशी रहावे. कारण ही लोकसभा निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी आहे, असे मत महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा तालुक्यातील येणेगूर, सालेगाव, आष्टा कासार येथे प्रचारसभा संपन्न झाली. यावेळी केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. निधीचा ओघ आपल्याकडे वळविण्यासाठी निवडून येणारा खासदार हा आपल्या हक्काचा असणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो.

म्हणूनच येत्या निवडणुकांमध्ये घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे ही विनंती या निमित्ताने केली. यावेळी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top