तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्या अंतर्गत असलेल्या साखर कारखान्यातील वजन काट्याची तपासणी करणे कामी जिल्हाधिकारी धाराशिव यांनी गठीत केलेल्या तालुकास्तरीय पथकात शेतकरी प्रतिनिधी म्हणून स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे व उपाध्यक्ष धनाजी पेंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संदर्भीय पत्रान्वये तालुका अंतर्गत असलेल्या साखर कारखान्यावरील वजनकाट्याची तपासणी करणे बाबत कळविले असुन, तुळजापूर तालुक्या अंतर्गत असलेल्या साखर : कारखान्यातील वजन काट्याची तपासणी करणे कामी जिल्हाधिकारी धाराशिव यांनी गठीत केलेल्या तालुकास्तरीय पथकात शेतकरी प्रतिनिधीची नेमणूक करणे बाबत आदेशित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी साखर कारखान्यातील वजन काटयाची तपासणी करणे कामी तालुका स्तरीय गठीत भरारी पथकात शेतकरी प्रतिनिधी रविंद्र इंगळे, धनाजी पेंदे यांची नियुक्ती केली आहे. तालुकास्तरीय गठीतसमिती पुढीलप्रमाणे- पथक प्रमुख तहसिलदार, तुळजापूर ए. एम. पवार, निरीक्षक नियंत्रक वजनमापन शास्त्र विभाग धाराशिव सचिव सहायक निबंधक सहकारी संस्था तुळजापूर, पोलिस उपनिरक्षक तुळजापूर, विशेष लेखा परिक्षक वर्ग 1(साखर)सहकारी संस्था प्रतिनिधी तुळजापूर, रविद्र इंगळे जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, धनाजी तानाजीराव पेदे जिल्हाउपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी, नियुक्त शेतकरी प्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी गठीत केलेल्या पथकासमवेत या तालुका कार्यक्षेत्रात येणा-या साखर कारखान्याचे वजनमापाची दर 15 दिवसातून अचानक तपासणी करून वेळोवेळी केलेल्या तपासणीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. असे तहसिलदार अरविंद बोळंगे यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या पञात म्हटले आहे.