भूम (प्रतिनिधी)- तालुक्यात नव्याने उभारण्यात येत आसलेले पवन चक्की प्रकल्प बंद करण्यात यावेत यासाठी दि 30 जानेवारी पासुन कॉग्रेस आयचे सचिव दत्ता मोहन तुपे रा. येडशी यांनी तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले आहे.
या पवनचक्की प्रकल्पामुळे पावसाचे प्रमाण घटणार आसून यामुळे पक्षाच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. हे प्रकल्प करताना अनेक ठिकाणी तालुक्यात झाडाची कत्तल झाली असून डोंगराकर हे प्रकल्प करताना मोठ्या प्रमाणात अवैद्य उत्खनन केल जात आहे. यामुळे निर्सगाचा -हास होत आहे. यासाठी दि 4 जानेवारी 2024 रोजी आपण याबाबत तक्रार करुनही याची दखल घेतली गेली नाही यासाठी आपण दि 30 जानेवारी पासून भूम तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केल्याचे तुपे यांनी निवेदनात म्हटले आहे.