नळदुर्ग (प्रतिनिधी)-मा.सर्वोच न्यायालयाच्या आदेशानुसार दुकाने व आस्थापने वरील पाट्या ह्या स्थानिक भाषेत असायला हव्यात अर्थात महाराष्ट्रात मराठी भाषेत, यासाठी 25 नोव्हेंबर हि तारीख शेवटची होती,याबाबत विविध वर्तमान पत्रातून,दूरदर्शनवरून संबधितानातांना समजले होते,शिवाय प्रशासनाला हि माहित होते,या आदेशाची तात्काळ अमलाबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सरकारला बजावले होते,न्यायालयाच्या अल्टीमेट नुसार व सरकारला मनसेने या आदेशाची अमलाबजावणी करावी अन्यथा खळखट्याक आंदोलन करण्यात येईल असेही सांगितले होते,परंतु महाराष्ट्रात प्रशासन कुठेही याबाबत कार्यवाही करताना दिसत नाही,त्यामुळे राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिकांना अनेक ठिकाणी दुकानाची तोडफोड करत इतर भाषेतील फलकास काळे फासत तोडफोड केली आहे व मराठी पाट्याचा आगृह धरला,नळदुर्ग मध्ये ही काही दुकाने व आस्थापनावर इतर भाषेत फलक आहेत. संबंधिताना तात्काळ मराठी पाट्या लावण्याच्या सूचना कराव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही असा इशारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे,निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत.मनसेने पत्र दिल्यानंतर इतर भाषेतील फलक असणाऱ्या आस्थापना संदर्भात पालिका प्रशासन आतातऱी मराठी पाट्याची सक्ती करणार का?व मनसेची पुढील भूमिका काय असणार?यामुळे प्रशासनाची डोकंदुःखी वाढली आहे.


 
Top