उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील गरीब गरजू व वंचित घटकातील नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसल्याने त्यांना लाभ देण्यात यावा अशी मागणी लोकशासन आंदोलन प्रणित बहुजन विकास संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार यांना शुक्रवारी (दि 1) रोजी देण्यात आले आहे.

बहुजन विकास संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदाराणा दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शहरात अनेक गरीब गरजू वंचीत नागतिकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नाही. शहरातील अनेक नागरिक मोल मजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत शिवाय विधवा,परितक्ता, अपंग निराधार नागरिक असून या योजनेच्या लाभापासून वंचीत आहेत. लाभार्थ्यांकडून त्यांचे दारिद्य्र रेषेखालील प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यांना लाभ मिळत नसल्याने दि 21 डिसेंबर पासून लाभार्थ्यांसह बहुजन विकास संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर समितीचे निमंत्रक कमलाकर सुर्यवंशी, सचिव धीरज कांबळे, उपाध्यक्ष मिलींद कांबळे आदींच्या सह्या आहेत.


 
Top