धाराशिव (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र खंडोबा मंदिर परिसरात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे यात्रा व धार्मिक कार्यक्रमाला अडचण येत असल्यामुळे ते अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.30 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. मात्र कळंब पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी ते अतिक्रमण 15 दिवसांच्या आत काढण्यात येईल असे लेखी आश्वासन आहे. त्यामुळे ते आमरण उपोषण दि.1 डिसेंबर रोजी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानाला गट विकास अधिकाऱ्यांनी दि.30 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन जायमोक्यावर स्थळ पाहणी केली. मंदिर परिसरा भोवती अतिक्रमण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ने मोजणी करून घेऊन आधी कायम कराव्यात व तो अहवाल पंचायत समितीला कळवावा अशा सक्त सुचना दिल्या आहेत. तसेच कारवाई न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण उपोषणकर्त्यांनी तात्पुरते स्थगित केले आहे यावेळी ग्राम पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.एस.गपाट, सरपंच चरणेश्वर पाटील, ग्राम विस्तार अधिकारी हनुमंत झांबरे ग्रामपंचायत सदस्य वसंत धोंगडे, समाधान मते ,रंजीत काकडे, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी उपोषणकर्त्यांना पत्र व ज्यूस देऊन उपोषण सोडवले या उपोषण आंदोलनामध्ये पांडुरंग मते ,जयवंत भातलवंडे, पांडुरंग भातलवंडे, सज्जन कोठावळे, तुकाराम भातलवंडे, नारायण ढवळे, यांचा सहभाग होता. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रसिद्ध प्रमुख सलीम पठाण, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद,किरण कांबळे, प्रशांत मते, खंडेराया भातलवंडे ,शिवशंकर भातलवंडे यांची यावेळी उपस्थिती होती.