भूम (प्रतिनिधी)-प्रत्येक देशात लोकशाही नांदली पाहिजे तर युद्ध परिस्थिती कधीच निर्माण होणार नाही. कायद्याचे राज्य आले तर गुंतवणूक वाढते अन प्रगती पण होते. सर्वांगाने लोकशाही बळकट झाली पाहिजे असे परखड मत अखंडवारी समाज प्रबोधनाची आलमप्रभू व्याख्यानमालेत तज्ञ व्याख्याते विवेक सावंत यांनी व्यक्त केले.
अखंडवारी समाज प्रबोधनाची आलमप्रभू व्याख्यानमाला गेल्या 12 वर्षा पासून सुरू आहे. यावर्षी देखील या व्याख्यानमालेचा पहिला दिवस पार पडला. पहिल्या दिवशी एम. के. सी. एलचे मुख्य सल्लागार विवेक सावंत यांचे भारताची ज्ञान युगात झेप या विषयावर तब्बल दोन तासाचे व्याख्यान झाले. यावेळी विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
विचार प्रगट करताना विवेक सावंत यांनी, देशाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी शक्यतो मात्र भाषेत शिक्षण घेणे गरजेचे आहे. परकीय जापान सारख्या देशांनी सुद्धा प्रगती करत असताना मात्र भाषेवर प्रभाव टाकलेला आहे. दुसऱ्या कितीही भाषा अवगत केल्या तरी मात्र भाषेवरचे प्रेम कमी होता कामा नये. समग्र राष्ट्रासाठी विचार शकती वाढण गरजेचं आहे. वर्ल्ड बॅकेनुसार भारत देश 39 व्या क्रमांकावर आहे. प्रत्येकाचा सर्वे वेगळा आहे. संस्कृती नसलेल्या देशाने पण प्रगती केली. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने तन-मन धन लावून योगदान देण काळाची गरज आहे असाही मत व्यक्त केले. व्याख्यानमालेसाठी कॅप्टन अजय रमेश मनसुके, संतोष वरळे, अंबादास देशपांडे यांच्यासह असंख्य युवकांनी परिश्रमाचा हात दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अलीम शेख यांनी तर आभारप्रदर्शन संतोष वरळे यांनी व्यक्त केले.