धाराशिव / प्रतिनिधी-

 शेतामध्ये काढून ठेवलेली ज्वारी व गहू या पिकास अचानकपणे आग लागली. त्यामुळे त्या आगीत कंसासह ज्वारी व गहू पूर्णपणे भस्मसात झाला आहे. 

धाराशिव तालुक्यातील झरेगाव येथील चंद्रकांत रंगनाथ सारफळे यांचे शेत गट क्रमांक ९२ मध्ये अडीच एकर क्षेत्र आहे. त्या शेतामध्ये असलेली ज्वारी व गहू काढून ठेवलेले होते. मात्र या पिकास अचानक आग लागली. त्या लागलेल्या आगीमध्ये काढून ठेवलेली ज्वारीच्या कणसाह कडबा व गहू पूर्णपणे जळून खाक झाला आहे. वर्षभर आपला संसाराचा गाडा हाकण्यासाठी शेतकऱ्याने राबराब राबवून पिकविलेले धान्य क्षणात जळून राख झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची आर्थिक मदत करुन दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी सारपळे यांनी केली आहे.

 
Top