उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हयात माहे जून ते ऑगस्ट 2022 पर्यंत वार्षीक सरासरीच्या 110.10 टक्के इतका पाऊस झाल्यामुळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाची निधी मागणी शासनास सादर करण्यात आली होती.त्यानुसार शासनाकडून निधी प्राप्त झाला असून  प्रापत निधीमधून बाधित शेतकऱ्यांना वाटप करावयाच्या अनुदान वाटपाची कार्यवाही पूर्ण झालेली आहे.

 यामध्ये तुळजापूर तालूक्याला मिळालेला निधी  11 कोटी 95 लाख 72 हजार प्रत्यक्षात वितरीत करण्यात आला आहे, उमरगा तालूक्याला मिळालेला निधी  53 कोटी 69 लाख  प्रत्यक्षात वितरीत करण्यात आला असून परंडा तालूक्याला मिळालेला निधी  33 लाख 26  हजार प्रत्यक्षात वितरीत करण्यात आलाआहे तसेच कळंब तालूक्याला मिळालेला 25 कोटी 44 लाख 69  हजार निधी  प्रत्यक्षात वितरीत करण्यात आला आहे, असा  एकूण निधी 90 कोटी 74 लाख 36 हजार  एवढा अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाची निधी बाधित शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे..

 याच कालावधीमध्ये सततच्या पावसामूळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे करण्यात येवून निधी मागणी शासनास सादर करण्यात आलेली होती. दि.13 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयान्वये उस्मानाबाद तालुक्याला प्राप्त 13 कोटी 63 लाख 59 हजार पैकी 8 कोटी 58 लाख 58 हजार निधी  प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला, तुळजापूर तालुक्यास प्राप्त 82 कोटी 17 लाख 53 हजार पैकी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना निधी 29 कोटी 54 लाख 58 हजार वितरीत करण्यात आला, उमरगा तालुक्यास प्राप्त 14 कोटी 79 लाख 18 हजार निधी पैकी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना  14 कोटी 46 लाख 64 हजार निधी वितरीत करण्यात आला , लोहारा तालुक्यास प्राप्त 34 कोटी 45 लाख 42 हजार पैकी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 18 कोटी 25 लाख  61 हजार निधी वितरीत करण्यात आला, भूम तालुक्यास प्राप्त 4 कोटी  26 लाख 50 हजार पैकी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 4 कोटी 26 लाख 50 हजार वितरीत करण्यात आला, परंडा 4 कोटी 26 लाख 50 हजार 1 कोटी 40 लाख 26 हजार पैकी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 1 कोटी 36 लाख 29 हजार निधी वितरीत करण्यात आला, कळंब तालुक्यास प्राप्त 66 लाख 64 हजार निधीतून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलेला निधी  66 लाख 58 हजार, वाशी तालुक्यास प्राप्त निधीतून 1 कोटी 86 लाख 6 हजार प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला निधी 1 कोटी 86 लाख 6 हजार, असा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलेला निधी एकुण  79 कोटी  84 लाख  आहे. 7900.84

 उर्वरीत निधी दि.21 ऑक्टोबर 2022 पर्यंत पुर्ण वितरीत  करण्याची दक्षता देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त माहे सप्टेंबर 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामूळे झालेल्या शेतीपिकांच्या  व फळपिकांच्या नुकसानीसाठी अनुक्रमे एकूण रक्कम रूपये 5501.60 लक्ष व रक्कम रुपये 19354.61 लक्ष इतक्या निधी मागणीचा प्रस्ताव या कार्यालयाकडून शासनास सादर करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी ओम्बासे  यांनी कळविले आहे.

 
Top