उस्मानाबाद /प्रतिनिधी -


कळंब तालुक्यातील वाकडी केज येथील ठाकरे गटाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वावर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये सरपंच श्रीमती परिमला अंबादास शिंदे, उपसरपंच श्री.तुकाराम अंबादास कोल्हे, सदस्य श्री.राहुल दिलीप रणदिवे, श्रीमती रत्नामाला सुरेश यादव, श्रीमती मंगल बाबुराव डुकरे, श्री.हनुमंत वैजिनाथ शिंदे, श्रीमती कविता सुरेश शिंदे, श्री.गणेश बाळासाहेब कोल्हे, श्री.संजय ज्ञानोबा फाटे श्री.हनुमंत कोल्हे, श्री.अंबादास कोल्हे, श्री.दिलीप रणदिवे, श्री.भगवानराव यादव, श्री.सुरेश यादव, श्री.चंद्रकांत फाटे, श्री.परमेश्वर कोल्हे, श्री.फुलचंद कोल्हे, श्री.राजभाऊ पुरी, श्री.अमोल वाघमारे, श्री.आबासाहेब रणदिवे, श्री.सुरेश शिंदे, श्री.समाधान कोल्हे, श्री.चंद्रकांत जाधव, श्री.अनंत रणदिवे, श्रीपती साळुंके आदींचा समावेश आहे.

स्थानिक विकासाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा हा सगळ्यांनी घेतलेला निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे. हा निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी सकारात्मक ठरेल. आता आपले सरकार असून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत, यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ताकदीने काम करणे गरजेचे आहे.

सर्वसामान्यांचे हित व अडचण लक्षात घेऊन लोकहिताचे निर्णय घेऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बद्दलची विश्वासार्हता वाढविणे हे आपले काम आहे. गावातील महावितरण संबंधी कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. असे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी उपस्थित गावकऱ्यांना आश्वासन दिले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संयोजक श्री.नितीन पाटील, तालुकाध्यक्ष श्री.अजित पिंगळे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री.संजय पाटील, श्री.पी.जी.तांबारे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.राजसिंह राजेनिंबाळकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.प्रशांत लोमटे, श्री. राहुल लंगडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top