उस्मानाबाद / प्रतिनिधी-
देशसेवा आणि आरोग्यसेवा या दोन्ही महत्वपूर्ण बाबी आहेत. देशसेवेसोबत आरोग्यसेवा ही सुद्धा एक देशसेवाचं आहे.आज क्लीन समता ग्रीन समता परिवारातर्फे या दोन्ही सेवा निस्वार्थ भावनेने पार पाडलेया बुवासाहेब जाधव आणि जनाब अजीज हैदरसाब शेख यांच्या प्रमुख उपस्थितित आझादिचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
मराठवाडा मुक्ति संग्रामामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आहुति दिली ज्यामधे स्वतंत्रसैनिक बुवासाहेब जाधव हेही अग्रेसर होते त्यांनी या लढ्यामध्ये आपल्या जीवाचे रानं केले होते. तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असताना चालू केलेल्या कावीळ या व्याधीवरील औषधामुळे श्री. ज़नाब अजिज हैदरसाब शेख हे महाराष्ट्रतील घराघरात पोहोचले. ज्यांच्या औषधामुळे आज कित्येक रुग्नाना काविळीपासून सुटका मिळाली आहे.
स्वतंत्रसेवा आणि आरोग्यसेवा या दोन्हीच महत्व लक्षात घेऊन क्लीन समता ग्रीन समता परिवारतर्फे उस्मानाबादच्या या दोन्ही रत्नाचा परिवाराचे अध्यक्ष नाना घाटगे, सचिव महेश काटे, सयाजी शेळके, अॅड.अर्जुन नायकवाडी, दिशा नागरी सहकारी पतसंस्तेचे सचिव पंकज पडवळ तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या परिवारातील सर्व सदस्याचे, कार्यक्रमासाठी उपस्थित राहीलेल्या सर्व नागरिकांचे,दैनंदिन कामातून वेळ काढून कार्यक्रमासाठी उपस्थित राहीलेल्या महिलावर्गाचे,बच्चे कंपनीचे तसेच सूत्रसंचलनाची जबाबदारी अगदी योग्यरित्या पार पाडल्याबद्द्ल सौ. रागिनी पाटिल यांचे नाना घाटगे यानी आभार मानले