उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दि. 14 मे 2022 रोजीचे 06.00 वा. पासून ते दि. 29 मे 2022 रोजीचे 24.00 वा पावेतो (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमाव व शस्त्रबंदी आदेश अपर जिल्हादंडाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी लागू केले आहेत.

या आदेशानुसार शस्त्र,सोटे,काठी,तलवार,बंदूक जवळ बाळगणे,लाठया,काठया,शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील,सहज हाताळता येतील अशा वस्तू बाळगण्यास सक्त मनाई आहे.कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणे,दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवता येणार नाही किंवा बाळगता येणार नाही किंवा तयार करणार नाहीत,आवेशी भाषणे,अंगविक्षेपण,विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता,नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे,निशाणी,घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ बाळगणार नाहीत,जाहिरपणे घोषणा करणे,गाणी म्हणने,वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत,व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत,पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक,मोर्चा काढता येणार नाही. याची नागरिकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

 
Top