उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कलम 370, उरी हल्ला, द काश्मिर फाइल्स यासारखे भावनिक मुद्दे पुढे करुन केंद्रातील भाजपा सरकारने जनतेची बेसुमार लूट सुरु केली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले असताना सरकारला त्याचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही. अशा परिस्थितीत इंधन दर कमी करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. सरकारला याची दखल घ्यावीच लागेल, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांनी दिला.

 पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीविरोधात उस्मानाबाद शहर, तालुका व जिल्हा काँग्रेसच्या वतीने उस्मानाबाद येथे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.4) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

  आंदोलनात प्रदेश सचिव दिलीप भालेराव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी अभिजित चव्हाण, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष प्रकाश आष्टे, सय्यद खलील, लक्ष्मण सरडे, प्रशांत पाटील तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, पांडुरंग कुंभार शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मेहबूब पटेल, प्रकाश चव्हाण, मागासवर्गीय विभाग जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, प्रदेश महासचिव शीला उंबरे, संजय घोगरे, आश्रुबा माळी, मिलिंद गोवर्धन, सांस्कृतिक विभागाचे प्रेमचंद सपकाळ, ओबीसी विभाग काका सोनटक्के, प्रभाकर लोंढे, सरचिटणीस अ‍ॅड.जावेद काझी, अ‍ॅड. लोखंडे, प्रवक्ता कृष्णा तवले, अशोक बनसोडे, मेहराज शेख, गजधने, अतुल चव्हाण, चाऊस, गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 
Top