उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दिव्यांगाचा 5% निधी खर्च न करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी  प्रहार संघटनेच्या वतीने जिलाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

  निवदेनात नमुद करण्यात आले आहे की,   जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग व्यक्ती करिता 5% निधी प्रहार संघटनेने वारंवार निवेदन देऊनही अद्याप खर्च करण्यात आलेला नाही तरी या योजनेपासून जिल्ह्यातील बरेच दिव्यांग बांधव वंचित आहेत तरी ज्या गावात अजूनही 5% निधी वाटप करण्यात आलेला नाही अशा ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही याची नोंद घ्यावी याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाप्रशासनाची राहील अशा आशयाचे निवेदन प्रहार अपंग संघटनेच्या वतीने देण्यात आले.

 यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,संघटक बाळासाहेब कसबे दत्ता पवार, बाळासाहेब पाटील, मेहबूब तांबोळी, महादेव खंडाळकर, नवनाथ मोहिते, जमीर शेख, शिवकुमार माने ,बाबासाहेब भोईटे ,दिनेश पोतदार,नवनाथ कचार आदी पदाधिकारी उपस्थित होते

 
Top