उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद राज्यमंत्री बच्चू कडू व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नाने राज्यातील दिव्यांग बंधू भगिनींची हेळसांड होऊ नये याकरिता जिल्ह्याभरातील सर्व सर्व दिव्यांग व्यक्ती करिता शासकीय रुग्णालय उस्मानाबाद व सार्वजनिक समाज कल्याण विभाग जिल्हापरिषद यांच्यावतीने तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी अबऊ कार्ड तपासणी व निदान विशेष मोहीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

 2 मार्च रोजी भूम येथील ग्रामीण रुग्णालय येथे , 3 मार्च परांडा उपजिल्हारुग्णालय , 8 मार्च उस्मानाबाद जिल्हासमान्य रुग्णालय , 9 मार्च तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे,10 मार्च उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे , 11 मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय लोहारा , 15 मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय कलंब येथे , 16 मार्च रोजी वाशी उपजिल्हा रुग्णालय या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी या शिबिरात सहभाग नोंदवावा असे आव्हान प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर “ काकडे यांनी केले आहे.

 प्रत्येक तालुक्यात दिव्यांगाना अडचण आल्यास खालील प्रतिनिधींना संपर्क साधावा चित्रा शिंदे भूम , बाळासाहेब कसबे , बाबा भोईटे , जमीर शेख उस्मानाबाद , महेश माळी , महादेव चोपदार शशिकांत मुळे तुळजापूर , अजीम खजुरे , वासुदेव काशीद उमरगा , श्रीमंत गरड महंमदअत्तर , अभिजित साळुंके लोहारा , गणेश शिंदे कळब , हेमंत उंदरे , सुरज उंदरे वाशी , नागनाथ पाटील , भारत नारनवरे परांडा . शिबिरामध्ये प्रहारचे सर्व तालुकामदतनीस उपलब्ध असून तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींनी काही अडचण असल्यास मदतनीसास संपर्क करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे .


 
Top