उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील दहिफळ येथील शिवाजी ढवळे शेतकर्‍याचा बुधवारी (दि.16) बैलाने मारल्यामुळे जखमी होऊन मृत्यू झाला. त्यानिमित्त ढवळे कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी सोमवारी (दि.21) भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी माजी सरपंच दत्तात्रय बोरके, माजी उपसरपंच नारायण भातलवंडे, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा पाटील, सुधीर मते, सुरेश मते, बंडू भातलवंडे आदी उपस्थित होते.


 
Top