उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना’ या सदराखाली शेततकऱ्यांच्या सोयीकरीता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाव्दारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे.या प्रणालीव्दारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबीकरीता 24 मे 2021 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकाअंतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोयाबीन,भात,तुर,मगु,उडीद,मका,बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असुन 24 मे 2021 पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करणे बंधनकारक आहे.

महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahaitgov.in/ हे संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा.शेतकरी स्वत:च्या मोबाईल,संगणक/लॅपटॉप/टेबलेट,सामुदायिक सुविधा केंद्र (CSC),ग्रामपंचायतील.संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जावून अर्ज करु शकतील. वैयक्तीक लाभार्थी म्हणुन नोंदणी करुन इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची आधार नोंदणी करावी.

 नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमुद करुन त्यांना योजनासाठी अर्ज करता येईल.अशा अर्जदारांना अनुदान वितरणापुर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल,त्याशिवाय अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.या कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामुहिक केंदाची मदत घेऊ शकता तसेच त्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास sao7064@rediffmail.com या ई मेल वर किंवा 02472-227178 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

 
Top