तुळजापूर / प्रतिनिधी-
शांततेने चालु असलेले आंदोलन दडपशाहीचा वापर करुन चिरडुन टाकण्याचा प्रयत्न राज्यसरकार करीत असुन १४४ कलमामुळे भाविकांना बाहेरुन का दर्शन मिळेना त्यात अडथळा येवु नये व व्यापारी वर्गाचे नुकसान होवु नये म्हणून हे आंदोलन मागे घेतले नसुन स्थगित केल्याचे सांगुन ठाकरेनी पाच वर्ष सरकार चालवुन दाखवावे असा आव्हान देवुन साधुसंतच ठाकरे सरकार पाडतील असा इशाराच भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य सुभाष भोसले यांनी पञकार परिषद घेवुन दिला .
भाजपा आधात्मिक आघाडीच्या वतीने राज्यातील मंदीरे उघडण्यासाठी गुरुवार दि. 5 पासुन श्री तुळजाभवानी मंदीरा समोर साधुसंतांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. माञ प्रशासनाने गुरुवार राञी श्री तुळजाभवानी मंदीर परिसरातील ३०० मिटर परिसरात १४४ कलम लागु करुन सहभागी साधुसंताना नोटीस बजावुन आंदोलन होवु नये यासाठी प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवार सकाळी ११ वाजता आचार्य तुषार भोसले यांनी पञकार परिषद घेवुन आंदोलन मागे नाही तर स्थगित करीत असल्याचे सांगितले
यावेळी बोलताना भोसले म्हणाले कि, मंदीर कधी उघडणार या बाबतीत मुख्यमंत्र्यांना दोन निवेदन देण्यात आली. पण त्यांनी आमची दखल न घेतल्याने हे आंदोलन सुरु केले तर ते दडपशाहीचा मार्गाने चिरडण्याचा प्रयत्न केला या कामी साधुसंतांना यात सहभागी होवु नये म्हणून नोटीसा बजावला त्यामुळे संत कधीही काळ्या फित लावुन निषेध करीत नाही पण करण्याची वेळ आणली रातोरात प्रशासने तंबु उखडुन लोकशाहीचा साधुसंत भक्ताचा अधिकार हिसकावून घेतला त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे शुक्रवार नवचंडी यज्ञ आयोजन होते ते यांनी होवु दिला नाही याचे फळे यांना भोगावे लागतील ,असे यावेळी म्हणाले यामुळे ठाकरे सरकारचा खरा चेहरा उघडा पडला मुह मे राम बगल मे छुरी हे ठाकरेचे वर्तन यावरुन दिसुन आले. तुम्ही आमचा तंबु उखडला पण देवदेवतांचे कृपा आशिर्वादाचे छञ कधीच हिसकावु शकणार नाही. राज्यातील ठाकरे सरकार हे मोगलांपेक्षा वाईट आणि ब्रिटिशांपेक्षा काळं सरकार असल्याची टीका केली. हिंमत असेल तर निवडणूक लावून दाखवा, तुमचं सरकार पाडू, असं थेट आव्हानही त्यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. महाराष्ट्रात आपतकाल स्थिती सुरु झाल्याचे यावेळी म्हणाले. हे आंदोलन स्थगित केलं नाही तर पुढील 15 दिवस तुळजापूरमध्ये कलम 144 लागू करु, अशा इशारा प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती तुषार भोसले यांनी दिली. त्यामुळे परिसरातील व्यापारी आणि तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून हे आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना
भक्ताचा भावनेचे आंदोलन- मंहत मावजीनाथ
हे आंदोलन भक्ताचा भावनेसाठी सुरु होते कुलचार कुलधर्म बंद असल्याने भक्त नैराश्यात चालले असल्याचे सांगुन हे आंदोलन पक्षाचे नाही तर साधुसंत भक्तांचेअसुन आमचा ऐका हातात माळा राहु द्या दुसऱ्या हात उचलायला भाग पडू नका असा इषारा येथील दशावतार मठाचे मंहत मावजीनाथ बाबांनी यावेळी दिला
