उस्मानाबाद / प्रतिनिधी-
सांजा  (ता. उस्मानाबाद)  येथील देविदास (नाना )  शंकरराव सूर्यवंशी( वय 81)  यांचे उस्मानाबाद येथील शासकीय दवाखान्यात कोरोनाचा उपचार घेत असताना  मंगळवार दि.  15 सप्टेंबर रोजी रात्री पाऊणे एक वाजण्याच्या दरम्यान निधन झाले  त्यांनी 1990 च्या सुमारास भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी पाच वर्षे काम केले होते राम मंदिराच्या आंदोलनात सहभाग ,विश्व हिंदू परिषदेच्या अनेक आंदोलनात सहभागी भारतीय जनता पार्टीच्या पडत्या काळात त्यांनी पायी, सायकलवर उस्मानाबाद तालुक्यात प्रवास करून भारतीय जनता पार्टीच्या शाखा स्थापन करण्यासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे देविदास (नाना) सूर्यवंशी हे तत्कालीन महाराष्ट्राचे नेते भाई उद्धवराव दादा पाटील यांच्या सोबत राहून  काही काळ काम केले होते खरं तर त्यांच्या सामाजिक कामाची सुरुवात शेतकरी कामगार पक्षाच्या कामाने सुरुवात झाली होती त्यांचा स्वभाव मनमिळावू होता त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी सकाळी सकाळी दहा वाजता सांजा येथे  करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने लोक हजर होते

 
Top