उस्मानाबाद / प्रतिनिधी-
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, उस्मानाबाद मार्फत सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण प्राप्त झाले असतील अशांना महामंडळाकडून जेष्ठता व गुणक्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
तसेच स्वःहस्ताक्षरातील अर्ज मोबाईल नंबर सोबत, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याबाबतचा पुरावा, पावती, आधार कार्ड, जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन तळमजला , उस्मानाबाद (फोन नं.022472-226602) या कार्यालयात दिनांक. 10 ऑगस्ट, 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत आणून द्यावेत किंवा टपालाव्दारे पाठवून देण्यात यावेत. तसेच उशीरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.उस्मानाबाद जिल्ह्यातील मांग, मातंग समाजातील व तत्सम 12 पोटजातीतील युवा, युवतींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, उस्मानाबाद मार्फत सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण प्राप्त झाले असतील अशांना महामंडळाकडून जेष्ठता व गुणक्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
तसेच स्वःहस्ताक्षरातील अर्ज मोबाईल नंबर सोबत, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याबाबतचा पुरावा, पावती, आधार कार्ड, जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन तळमजला , उस्मानाबाद (फोन नं.022472-226602) या कार्यालयात दिनांक. 10 ऑगस्ट, 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत आणून द्यावेत किंवा टपालाव्दारे पाठवून देण्यात यावेत. तसेच उशीरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.उस्मानाबाद जिल्ह्यातील मांग, मातंग समाजातील व तत्सम 12 पोटजातीतील युवा, युवतींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी केले आहे.